
सध्या जमाना आहे तो बुफे पद्धतीचा. या बद्दल ज्याला माहीत नाही त्याने लग्नाचे जेवणच जेवले नसेल असे समझुन चला.. तर अश्या पद्धतींमध्ये जेवणाच्या पदार्थांचे टेबल मांडलेले असतात. प्रत्येकाने आपले ताट घेऊन आपल्याला हवं तितकं घ्यायचं आणि उभ्या उभ्या किंवा बसण्याची सोय असेल तर खुर्च्यांवर बसुन जेवायचं अशी पद्धत असते.. अश्या प्रकारे जेवण वायाही जात नाही आणि कमी जेवणात जास्त लोकांची जेवणं उरकली जातात.
तर हे सगळं लिहीण्याच निमित्त म्हणजे, नुकतच मला एका सत्यनारायणाच्या पुजेसाठी बोलावणे होते. माझ्या मामांच्या चाळीमध्ये सत्यनारायणाची पुजा होती. आमंत्रण देताना त्यांनी सांगितले की बुफे जेवण आहे म्हणून.. चाळीत आणि बुफे ??? चला म्हटलं चवं घेऊन येऊ.. मामाच्या चाळीत पोहचलो. सत्यनारायणाच्या पाया पडतॊ आणि मनात म्हटलं की जेवण चांगलं असू दे.. :) मामा सोबतच जेवणासाठी गेलो.. जेवणाच्या मंडपामध्ये दोन टेबलांवर जेवण मांडलेलं होत.. जेवणाचा मेनू काय असेल?? गेस करा चवन्नी देईल ;)
डाळ-भात, बुंदी आणि शाक... इतकं पोटभरून जेवलो की विचारु नका.. गावच्या सारखीच चव ती सुद्धा मुंबईमध्ये आणि बुफे पद्धतिने म्हणजे स्वर्ग दोन बोटंच उरला होता...
सत्यनारायण पावला त्या दिवशी... ;)
4 comments:
आका लहानपणी आम्ही एकपण पंगत सोडायचो नाही...शाक म्हणजे सगळ्यात भन्नाट प्रकार...पंगतीला शाकची जी चव असायची ती कुठेच नाही
Ayala Bharich Ideachi Kalpana ahe ki ;)
पहिली पंगत म्हणजे ताजे आणि सुग्रास भोजन.. बाकी लग्नाच्या पंगतीत जास्त कधी जेवलो नाही.. पण ती चव दुसरीकडे कुठे मिळत नाही हेच खरे..
चाळीत बुफे म्हणजे सोने पे सुहागा...!!!
बाकी जेवण चांगलं असेल तर...पगंत आणि बुफे दोन्हीही सारखेच...!!!!!
Post a Comment